Tuesday, June 22, 2021

 berlin

Noted for its cultural flair, Berlin is home to the world famous Berlin Opera and Berlin Philharmonic Orchestra, while its diverse art scene encompasses hundreds of galleries, events, and museums, including those on Museum Island, a UNESCO World Heritage Site

Berlin is by far the cheapest capital city in Western Europe, so it's a great place for budget-minded travlers and backpackers seeking world-class museums, cheap food, crazy nightlife, and affordable accommodation. Prices are slowly rising but there are still easy to visit without spending a lot of money

Berlin is such a cheap capital city, because it is not capital city for too long. Not long ago, Berlin was divided into two parts. West Berlin was quite isolated, which made it not really eligible. East Berlin was the capital of a country, which called itself socialist.

Most people in Berlin are able to speak English, and you can easily get by with it. Furthermore, there is a relatively large community of expatriates from all over the world in Berlin. Their language of choice isIf your only concern is to Survive, then yes, you can survive easily with 0% German knowledge. But when it comes to socializing, making German friends, then its better to learn German or at least try to speak it. Although Germans do speak English, sometimes they feel more comfortable speaking in their own language. often English.

Compared to other European countries, Germany's prices are cheaper because of fierce competition between large retailers. "We have a comparatively high concentration of supermarkets on the German market and a merciless competition between large retailers, which leads to prices being very low








 

Bad Henninger


Arenfels Castle is an impressive landmark of Bad Henninger. With its location in the midst of vineyards and the Rhein winding through the vineyards above the castle, more people than ever before enjoy the spectacular view of the castle and the river Rhine.





 

Hamburg

Second only to Berlin in size and population, the city of Hamburg is home to one of the biggest harbors in Europe. A stroll along its many waterways and canals illustrates why it has been called the "Venice of the North." Don't miss a trip to the local fish market (Fischmarkt), the Merchants District (marked by its imposing red-brick architecture), a fine dining experience along the river or a night out in the university quarter. And did we mention the Reeperbahn (red light district)? It's quite famous for its… red lights.




Monday, June 14, 2021

Amsterdam a visit

 एक वेगळा अनुभव म्हणून सायंकाळी dusseldorf हून सहलनावेने अँम्सटरडॅमकडे निघालो. क्रूझ देखणी होती पण बसण्याची व्यवस्था असलेली केबिन मात्र अती अरुंद होती. क्रूझ बघत हिंडण्यात मौज वाटली. एका ठिकाणी कर्कश्श गाणी, नृत्य चालू होते. तिथेच मोठा बार होता. सर्व प्रकारची दारू उपलब्ध असल्याने त्यातील शौकिनांची चंगळ होती. वरच्या मजल्यावर मोठ्या डायनिंग रूममध्ये डिनरची व्यवस्था होती. सुमारे ३०० पदार्थ मांडून ठेवले होते. तिथे बनवलेल्या खाद्यपदार्थांची नावे आपल्यासारख्या नवख्यांना चटकन कळणे कठीण! त्यासाठी तिथे देखरेख करीत असलेल्या माणसाला विचारून घेणे सोपे! त्यामुळे शाकाहारी पदार्थ लक्षात आले. माझ्या सोबत साधारणतः १३० च्या वर लोक भारतीय होते. आपल्याला सगळे कळते असा गंड असणाऱ्यांना काहीही सांगून उपयोग नव्हता. विदेशात चौकसपणाने निरीक्षणशक्ती राबवावी हे ही कित्येकांना कळत नाही, याला काय करावे? काहींनी अन्न घेण्याच्या ट्रे मध्ये अक्षरशः शिगोशिग भरून पदार्थ घेतले. चाखल्यावर न आवडणारे पदार्थ बिनदिक्कतपणे कचरा डब्यात फेकून दिले. सॉसेज, बीफ न खाणाऱ्यांनी ते ट्रेमध्ये घेतले व कळल्यावर फेकले. या उलट अन्य युरोपीय प्रवासी मात्र आपल्या ट्रे मध्ये निवडक २-४ पदार्थ वाढून घेत होते व ते संपल्यावर पुन्हा उठून हवे ते घेत होते. आपल्याच काही भारतीयांकडून होणारी अन्नाची नासाडी पाहून वाईट वाटत होते.

लंडनमध्येही चहा, कॉफी, दुधाच्या मशीनपाशी असाच अनुभव आला होता. एकदा बटण दाबल्यावर थोडी प्रतीक्षा करावी ना? पण काहीजण दोन-चार वेळा भराभर बटणं दाबत होते. आतला द्रवपदार्थ भसाभस बाहेर येताच त्यांची तारांबळ उडत होती तर काहींनी मशिनच बिघडले असल्याचे सांगून टाकले.
या लहानसहान गोष्टी वाटल्या तरी यामुळे आपले हंसे होत नसून देशाचे होते. कारण विदेशात आपण आपल्या देशाचे प्रतिनिधी असतो, ही जाण यायला हवी,असे प्रकर्षाने वाटले. ती केवळ शिक्षणानेच येते असेही वाटत नाही!!
अँम्सटरडॅमचे बंदर प्रशस्त आणि विलक्षण स्वच्छ होते. शहरही सुंदर आहे. तिथे ट्युलिप्सची प्रदर्शनी पाहताना आपण वेडावून जातो. अनेक रंगांची जणू उधळण होते आहे असे वाटते. खूप फिरत तो रंगानुभव दृष्टीत साठवून घेण्याचा प्रयत्न केला. या देशातून जगभरात ट्युलिप्स जातात. वेळ भराभर जात होता पण ट्युलिप्स संपत नव्हते!!
















Tuesday, April 13, 2021

 *माओवादाचा रक्तरंजित प्रवास व उतार*

मिलिंद महाजन

महाराष्ट्रात माओवाद्यांचा वावर आणि उपद्रव अनेक दशकांपासून कायम आहे. कर्तबगार अधिकारी आणि खंबीर नेत्यांमुळे आता नक्षली उपद्रव असणारा महाराष्ट्रातील भूभाग बराच कमी झाला आहे. *मात्र, याचवेळी माओवाद्यांनी शहरी भागात विविध माध्यमांमधून हातपाय पसरले आहेत.* राज्यातील आंत्यतिक गरिबी आणि शोषणाचे दर्शन *समाजाला घडविण्याचे श्रेय माओवाद्यांना दिले तरी त्यांचा मार्ग हिंसक व येथील एकाही व्यवस्थेवर विश्वास ठेवणारा नाही.*

एल्गार परिषद प्रकरणात काही आरोपींना अटक केल्यापासून राज्यात आणि देशात नक्षलवादी; माओवादी संघटना सतत चर्चेत आहे. माओवादी संघटनेबद्दल समाजात गैरसमजच जास्त आहेत.( म्हणजे ते गरिंबाचां उध्दार करणारे व लोकशाही वर विश्वास असणारे हा गैरसमज ) सीपीआय आणि एमसीसी या दोन जुन्या माओवादी संघटनांचे विलीनीकरण करून सप्टेंबर २००४मध्ये *'माओ'* ही संघटना उदयाला आली. *या एकीकरणामुळे माओवाद्यांची शक्ती इतकी वाढली की पशुपती ते तिरुपती या 'रेड कॉरिडॉर'मध्ये त्यांच्या हिंसाचाराला ऊत आला.* म्हणूनच केंद्र सरकारने जून २००९मध्ये माओ या संघटनेवर एक दहशतवादी संघटना म्हणून बंदी घातली. *आजही माओवादी संघटना एक प्रतिबंधित दहशतवादी संघटना आहे.* या संघटनेबद्दल थोडी माहिती असणे आवश्यक आहे.

या माओवादी संघटनेवर दहशतवादाचा शिक्का मारून बंदी का घातली गेली, हे समजून घेण्यासाठी *या संघटनेचे उद्दिष्ट आणि ते साध्य करण्याचे मार्ग नक्की काय आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे.* *'स्ट्रॅटेजी अॅण्ड टॅक्टिक्स ऑफ इंडियन रिव्होल्यूशन'* या पुस्तकात माओवाद्यांनी त्यांचे उद्दिष्ट आणि ते साध्य करण्याचे मार्ग *अगदी स्पष्ट लिहिले आहेत.* *त्यानुसार, 'आज अस्तित्वात असलेली राजकीय, आर्थिक आणि संपूर्ण सामाजिक-सांस्कृतिक व्यवस्था नष्ट करून त्या जागी नवीन माओवादी व्यवस्था स्थापन करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.* शस्त्रबळावर संपूर्ण राजकीय सत्ता कब्जात घेणे, सत्ताप्राप्तिचा हा विषय युद्धाद्वारे निकाली काढणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.' माओवादी पुढे लिहितात की, *'या उद्दिष्टप्राप्तिसाठी एक माओवादी लष्कर तयार करून भारतीय लष्कर, पोलिस आणि संपूर्ण प्रशासन व्यवस्था नष्ट करणे हेच आमच्या माओवादी क्रांतीचे मुख्य लक्ष आहे.* चीनच्या क्रांतीचा मार्ग हाच आमचा मार्ग आहे आणि *तो मार्ग आहे प्रदीर्घ युद्धाचा.'*

माओवाद्यांनी काय साध्य करावयाचे आहे आणि ते कसे साध्य करणार आहेत, *हे अगदी स्पष्ट शब्दांत जाहीर केले आहे.* *त्यांना भारताची घटना मान्य नाही.* आज अस्तित्वात असलेली शासन व्यवस्था *माओवाद्यांना उद्‌ध्वस्त करायची आहे.* एकुणात माओवाद्यांनी *भारताविरुद्ध युद्ध पुकारले आहे.* अशा दहशतवादी संघटनेचा महाराष्ट्रात शिरकाव का व केव्हा झाला? वाढ कशी झाली? याची माहिती असणे गरजेचे आहे.

*महाराष्ट्रात शिरकाव*

महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेला लागून असलेल्या आंध्र प्रदेशमध्ये *स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच* साम्यवादी हिंसक आंदोलने सुरू होती. तेलंगण आणि श्रीकाकुलम भागात या हिंसक आंदोलनांमुळे हजारो नागरिकांचा बळी गेला होता. साम्यवादी संघटनांचा हिंसाचार आणि त्यांच्या विरोधात सरकारी कारवाई हे चक्र १९४६ पासून कित्येक दशके सुरू होते. १९७९ मध्ये माओवादी संघटनेच्या आंध्र प्रदेश राज्य समितीने 'गरिला झोन'ची योजना सादर केली. या योजनेप्रमाणे तेलंगणच्या करीमनगर, अदिलाबाद, वारंगळ आणि खम्मम या चार जिल्ह्यांचा एक गरिला झोन तयार करून तेथे पार्टीचे सशस्त्र दलम तयार करावे असे ठरले. या गरिला झोनच्या पिछाडीला असलेल्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उडिशा या राज्यांतील जंगल भागात माओवाद्यांनी सामाजिक संघटना सुरू करून एक मजबूत तळ तयार करावा, असे ठरले. यामागचा उद्देश असा होता की, तेलंगण गरिला झोनमध्ये सशस्त्र हल्ले सुरू झाल्यानंतर पोलिसांचे प्रतिहल्ले जास्त प्रमाणात वाढले, तर पिछाडीच्या या तीन राज्यांतील जंगल भागात माओवादी दलम माघार घेऊन सुरक्षित राहतील. 'गरिला झोन'मध्ये सशस्त्र हल्ले आणि पिछाडीच्या जंगल भागात सुरक्षित तळ अशी ही योजना होती. या योजनेप्रमाणे १९७९ मध्ये माओवादी पक्षाचे एक तृतीयांश सदस्य महाराष्ट्रातील गडचिरोली, मध्य प्रदेशातील बस्तर आणि उडिशातील कोरापुट जिल्ह्यातील घनदाट जंगल भागात शिरले. *अशाप्रकारे माओवाद्यांचा महाराष्ट्रात शिरकाव झाला.*

*अॅनिहिलेशन थिअरी*

तेलंगण गरिला झोनमधून मोठ्या संख्येने माओवादी नेते आणि कार्यकर्ते गडचिरोली, बस्तर आणि कोरापुट जिल्ह्यात कामाला लागले. आदिवासी, शेतमजूर, कामगार आणि दलित या विविध क्षेत्रांत कामाला सुरुवात करून एक मजबूत सामाजिक पाया उभारण्याचे काम सुरू झाले. माओवादी संघटनेत काम करणारे दोन भाग आहेत. *एक, जंगलातील सशस्त्र माओवादी आणि दोन, त्यांना मदत करणारे शहरातील (अर्बन) माओवादी.* सशस्त्र माओवादी चंद्रपूर-गडचिरोलीच्या जंगल भागात शिरले तेव्हाच त्यांना मदत करण्यासाठी १९७९-८०च्या सुमारास मुंबईहून तीन उच्चशिक्षित माओवादी जोडपी नागपूर-चंद्रपूर जिल्ह्यातील गावांत येऊन राहू लागली. तेलंगण गरिला झोन योजनेचा हा एक भाग होता.

या अर्बन माओवाद्यांनी युवक, आदिवासी, दलित, कामगार इत्यादी सामाजिक घटकांमध्ये काम करून त्यांच्या संघटना स्थापल्या. *जंगलातील माओवाद्यांनी सशस्त्र दलम उभे करून हिंसाचार करायचा आणि त्यांच्याच शहरी माओवाद्यांनी विविध सामाजिक घटकांमधून या सशस्त्र हिंसाचाराला मदत करायची, रसद पुरवायची आणि संरक्षक कवच प्रदान करायचे अशा रीतीने महाराष्ट्रात त्यांच्या कामाला सुरुवात झाली.* दोन नोव्हेंबर १९८० रोजी सिरोंचा तालुक्यात सुरक्षा दल आणि माओवाद्यांची चकमक झाली आणि सिरपूर दलमचा माओवादी कमांडर पेद्दी शंकर हा ठार झाला. इथून महाराष्ट्रात रक्तरंजित माओवाद सुरू झाला. पुढील दशकांमध्ये माओवादी हिंसाचाराचे लोण नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांत पसरले.

*देशातील विविध माओवादी संघटनांमध्ये सुरू असलेल्या विचारमंथनाची माहिती असणेही आवश्यक आहे.* कारण या विचारमंथनातूनच पुढील काळात माओवाद्यांच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल झाला. १२ डिसेंबर १९६९ रोजी माओवाद्यांचा सर्वोच्च नेता चारू मुजुमदार याने प्रसिद्ध 'अॅनिहिलेशन थिअरी' जाहीरपणे मांडली. *'अॅनिहिलेशन थिअरी' म्हणजे, 'सर्व वर्गशत्रूंना खतम करा' अर्थात, मारून टाका!* या 'थिअरी'ला सर्वसामान्य माओवादी *'खतम थिअरी'* म्हणू लागले. 'दुर्गम ग्रामीण भागांत सशस्त्र दलम निर्माण करायचे आणि या दलमनी त्या-त्या भागांतील सरंमजामदार, जमीनदार, सावकार आदी वर्गशत्रूंना मारून टाकायचे. असे केल्यानेच माओवादी क्रांतीची सुरुवात होईल', असे चारूचे स्पष्ट म्हणणे होते.

चारू मुजुमदारच्या 'खतम थिअरी'ला आंध्र प्रदेशातील बऱ्याच माओवादी नेत्यांचा विरोध होता. हा विरोध हिंसाचाराला नव्हता. हिंसाचार तर अपेक्षितच होता. पण त्यांचे म्हणणे असेही होते की, *या हिंसक कारवायांना पाठिंबा मिळण्यासाठी विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक चळवळीही उभ्या केल्या पाहिजे.* याशिवाय, माओवादी क्रांती समाजात रुजणार नाही. त्यानुसार, आंध्र प्रदेशातील नेत्यांनी विविध सामाजिक घटकांत काम सुरू केले. आदिवासी, दलित, शेतमजूर, कामगार, युवक इत्यादी समाज घटकांत संघटना तयार झाल्यात. प्रत्येक घटकांच्या विशिष्ट समस्यांवर आंदोलने सुरू झालीत. संघटना वाढत गेल्या. जंगल भागातील दलमच्या हिंसक कारवायांना शहरी आणि ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात सामाजिक पाठबळ मिळाविण्याच्या या योजनेला माओवादी 'मास ऑर्गनायझेशन अॅण्ड मास स्ट्रगल' (एमओ अॅण्ड एमएस) असे म्हणतात.

१९७९-८०मध्ये माओवादी सशस्त्र दलमने तेलंगणातून चंद्रपूर जिल्ह्यात शिरकाव केला. मुंबईतून आलेल्या त्या तीन उच्चशिक्षित जोडप्यांनी शहरी भागात सामाजिक संघटनाबांधणी सुरू केलीच होती. सोबतीने दलमने जंगल भागात हिंसक कारवाया सुरू केल्या. तेंदूपत्त्याला अत्यल्प भाव देऊन व्यापारी-ठेकेदार आदिवासींचे शोषण करीत होते. या समस्येच्या विरोधात १९८०पासून माओवादी संघटनेने आंदोलन सुरू केले. याचा परिणाम असा झाला की तेंदूपत्त्याच्या भावात कित्येक पटीने वाढ होऊन आदिवासींना त्याचा मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ झाला. *माओवाद्यांना स्वत:चा सामाजिक आधार वाढविण्यात फायदा झाला.* अशा रीतीने 'एमओ अॅण्ड एमएस'च्या प्रयोगाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. २५-२६ फेब्रुवारी १९८४ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर या गावी माओवादी संघटनेने एका सभेचे आयोजन केले. या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. तेलंगणच्या बाहेर सामाजिक संघटना तयार करून मोठे सामाजिक आंदोलन करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न कमलापूरमध्ये झाला हे माओवादी स्वत: मान्य करतात.

*काही लाभही*

माओवादी चळवळीमुळे समाजातील अतिदरिद्री घटकाच्या जीवनमरणाच्या समस्या जगासमोर आल्यात, *हे निष्पक्ष विचार केल्यानंतर लक्षात येते.* निर्दय जमीनदारी आणि रक्तपिपासू सावकारी व्यवस्था यांच्या जीवघेण्या पाशातून असहाय्य, उपेक्षित वर्गाची काही प्रमाणात सुटका झाली. महाराष्ट्राचा विचार केला तर तेंदूपत्ता, बांबू कटाईच्या दरात वाढ होऊन गरीब, असंघटित वर्गाला आर्थिक लाभ झाला. उपेक्षित, दुर्गम भागात विकासकामांना गती मिळाली. आणखी एक बाब समजून घेतली पाहिजे. १९४६पासून तेलंगण भागात साम्यवादी संघटनांच्या नेतृत्वाखाली जमीनदारी व्यवस्थेविरुद्ध हिंसक आंदोलन सुरू होते. हा हिंसाचार पाहून १८ एप्रिल १९५१ रोजी आचार्य विनोबा भावे हे आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली गावी आले. या गावातील दोन तृतीयांश कुटुंबे भूमिहीन शेतमजूर होती. अतिदरिद्री स्थितीत हे लोक जेमतेम जिवंत होते. मन विषण्ण करणारी समाजातील ही विषमता पाहून विनोबांनी जमीनदारांना आवाहन केले, की त्यांनी त्यांची जमीन या उपेक्षित वर्गसाठी दान करावी. त्या भागातील जमीनदार व्ही. रामचंद्र रेड्डी यांनी तात्काळ आपली शंभर एकर जमीन दान केली आणि *येथूनच जगप्रसिद्ध भूदान चळवळीला प्रारंभ झाला.* भूदान चळवळीला रक्तरंजित साम्यवादी आंदोलनाची पार्श्वभूमी होती, हे विसरून चालणार नाही. *साम्यवादी-माओवादी हिंसक आंदोलनाच्या दबावामुळे सीलिंग कायदे आणि तत्सम भूमी सुधार कायदे करावे लागले.* आत्यंतिक विषम समाजव्यवस्थेत काही प्रमाणात सुधारणा झाली. साम्यवादी माओवादी चळवळीच्या प्रारंभिक स्थितीत समाजातील वंचित वर्गाला काही लाभ निश्चितच होतात. *परंतु माओवाद्यांचे मुख्य उद्दिष्ट रक्तरंजित मार्गाने राजकीय सत्ता ताब्यात घेण्याचे असल्यामुळे सामाजिक समस्यांचे निराकरण झाल्यानंतरही, रक्तपाताचे चक्र सुरूच राहते आणि शेवटी या चक्रव्यूहात समाजातील उपेक्षित, वंचित वर्गच उद्‌ध्वस्त होतो.* माओवादी चळवळीच्या प्रारंभी चंद्रपूर-गडचिरोलीतील शोषित जनतेला निश्चितच काही प्रमाणात आर्थिक लाभ झाला. *परंतु माओवादी हिंसाचाराचे, रक्तपाताचे हे चक्र ४० वर्षांनंतरही थांबलेले नाही.*

*दारुण वस्तुस्थिती*

माओवादी संघटना आपला विस्तार सहसा दुर्गम आदिवासी भागात करतात. महाराष्ट्रात गोंड, माडिया या आदिवासीबहुल भागात माओवादी संघटना काम करते. नक्षलबारी आंदोलनदेखील संथाल, राजवंशी, ओरॉव या आदिवासी भागांत झाले. श्रीकाकुलम आंदोलन सावारू, जाटापू या आदिवासीबहुल भागात, तर लखीमपूर-खेरी आंदोलन भारू, रासिक्स या आदिवासीबहुल भागात झाले. एक असे लक्षात येते की, *माओवादी संघटनेतील उच्च आणि सर्वोच्च पातळीवर बंगाली आणि तेलुगू नेत्यांचा भरणा आहे.* *संघटनेच्या नेतृत्वात आणि निर्णयप्रक्रियेत आदिवासींना कोणतेही स्थान नाही.* *आदिवासींचा उपयोग फक्त प्यादे किंवा सैनिक म्हणूनच केला जातो, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.* याचा परिणाम असा होतो की, सुरक्षा दले आणि माओवादी असा हिंसक संघर्ष सुरू झाला *की या संघर्षात बहुसंख्य आदिवासीच मारले जातात.* १९८०पासून आजपर्यंत महाराष्ट्रात माओवादी हिंसाचारामुळे ५८८ सामान्य नागरिक, २४२ पोलिस प्राणास मुकले. २६२ माओवादी ठार झालेत. *माओवाद्यांनी ८३० लोकांना मारले आहे, हे लक्षात घेणे जरुरी आहे.* इतर हजारो जखमी होऊन कायमचे अपंग झाले. मारले गेलेले नागरिक, पोलिस व माओवादी हे बहुसंख्येने स्थानिक आदिवासी आहेत. *वरिष्ठ माओवादी नेते सुरक्षित राहिले.* *ज्या सामान्य नागरिकांच्या भल्यासाठी आम्ही लढतो आहोत असे माओवादी आग्रहपूर्वक सांगतात, त्याच सामान्यांचा ते बळी घेत आहेत ही आजची दारुण वस्तुस्थिती आहे.*

१९८०-९०च्या दशकात माओवादी चळवळ महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांत पसरली होती. सर्वत्र हिंसाचार सुरू झाल्यानंतर कणखर राजकीय नेते आणि कर्तबगार अधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा दहशतवाद कमी झाला. हिंसक दलम विरुद्ध प्रभावी पोलिसी कारवाई, सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजाभिमुख-संवेदनशील प्रशासन, शासनातर्फे जनजागरण आणि माओवाद्यांसाठी शरणागती योजना या आणि इतर सर्वंकष प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील ही माओवादाची; नक्षलवादाची समस्या कमी झाली. आता फक्त गडचिरोली-गोंदियातील मोजक्याच तालुक्यापुरती मर्यादित आहे. जशी राजकीय परिस्थिती बदलते तसे अधिकारी बदलतात आणि त्याप्रमाणे माओवादी हिंसाचारात चढ-उतार सुरू असतात.

*शहरी भागांत आपल्या सामाजिक संघटना स्थापन करून मोठे सामाजिक आंदोलन करणे हे किती प्रभावी आणि लाभदायक आहे याचा आतापर्यंत माओवाद्यांना पुरेपूर अनुभव आला आहे.* नजीकच्या भविष्यात, माओवादी संघटना शहरी भागांत मोठी आंदोलने करून अराजकसदृश परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करतील असे दिसते आहे. महाराष्ट्र, इतर राज्ये आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना याचे किती आकलन आहे आणि राजकीय नेतृत्व तसेच सरकारी यंत्रणा त्यावर कितपत प्रभावी उपाययोजना करते त्यावर आपल्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे. *शांतता-स्थैर्य-विकास की हिंसाचार-रक्तपात-अराजक यातून निवड करण्याची जबाबदारी आता सामान्य नागरिकांची आहे.*

(लेखक माओवादाचे अभ्यासक आहेत.)
(महाराष्ट्र टाईम्स )